Friday, September 16, 2011

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा सहज सुंदर आविष्कार घडविणार्‍या " महाराष्ट्राच्या लोककला "


प्रस्तावना

॥श्री ज्ञानेश्वर॥

समृद्ध लोककलांचा वारसा या महारष्ट्राला लाभला आहे. मौखिक आणि ग्रांथिक अशा दोन भक्कम तीरांमधून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीच्या प्रवाह अखंडपणे वाहत आहे. महारष्ट्राच्या लोककला, महाराष्ट्राच्या लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या सर्वांच्या एकत्रिकरणातून उभी राहते ती महाराष्ट्राची लोकसंस्कृती.

मौखिक परंपरेत नृत्य, नाट्य, संवाद, लोकगीते, लोकभूमिका यांचा सुरेख समन्वय साधला गेला. त्यातूनच म‍र्हाटमोळा लोकरंग उभा राहिला आणि या लोकरंगात मराठी मनाचे उत्कट भावदर्शन पाहायला मिळाले. उद्‍भोदन, मनोरंजन आणि प्रबोधन घडवुन ’कळनारी भाषा आणि पेलणारे तत्त्व देणारे’ तसेच बोलीभाषेत वेदांतांचा अर्थ सांगून नैतिकतेची मूल्ये जनलोकात रुजविलेल्या या लोककला म्हणजे एक स्वतंत्र लोकविद्दापीठ आहे.

जनलोकांचे मनोरंजन करीत त्यांना जाता जाता नीतीच्या चार गोष्टी सांगणारी लोककला प्रबोधनाचे एक साधन आहे.ह्या लोककलांचे शरीर जरी मनोरंजनाचे असले तरी आत्मा हा प्रबोधनाचा आहे. लोककलांचे अस्तित्व हे लोकजीवनाशी बांधलेले आहे. भारतात अनंत काळापासून नांदत आलेली कृषी संस्कृती, त्यातून व्यक्त होणार्‍या ग्रामीण जीवनातील प्रतिमा, जनमाणसात रुजलेले लोकाचार आणि लोकरुढी याला रंजकतेने नटवित ही लोकसंस्कृती उभी राहते. लोकजीवनाचे भावविश्व त्यात प्रतिबिंबित होते. म्हणून लोकसंस्कृतीचा सहजसूंदर आविष्कार घडविणारी लोककला ही अनेक परिवर्तनातून आपला वाटा शोधीत शोधीत जनलोकात आपले स्थान टिकवून आहे.

महाराष्ट्राच्या प्रभावी लोककलांमधे प्रामुख्याने कीर्तन, भारुड, लळित, दशावतार, गोंधळजागरण, भराड, लोकनाट्य, तमाशा, गण, गौळण, पोवाडा, भेदिक या लोककलांचा समावेश करावा लागेल. महाराष्ट्रातील पारंपारिक लोककलांचे त्यांच्या प्रयोजनांवरुन चार प्रकारात वर्गिकरण करता येईल.

१) आध्यात्मिक प्रबोधन घडविणारी लोककला, किर्तन, भारुड, लळित, दशावतार इ.
२) मनोरंजन पुरुषार्थ जागविणारी लोककला शाहिरी, पोवाडे, भेदिक इ.
३) लोकधर्माचे लोकाधार मांडणारी लोककला-गोंधळ, भराड, जागरण इ.
४) काहिशा शृंगारातून मनोरंजनाचा खजिना लुटनारी लोककला-तमाशा, लोकनाट्य, गण, गौळ्ण इ.


मौखिक साहित्याच्या परंपरेतील लोकसाहित्याला नृत्य, नाट्य, संवाद, संगीत, लोकभूमिका यांचा स्पर्श होतो. तेव्हा साहित्यातील लोकरंग कलेच्या अंगाने अविष्कार घेत घेत लोककला जन्म घेते. महाराष्ट्राची प्रत्येक लोककला ही निरुपण प्रधान आहे. निवेदन, निरुपण, संवाद किंवा बतावणी सांगूनच कला सादर केली जाते. म्हणून लोककलेतील नृत्य, नाटक, गीत हा जरी मनोरंजनाचा भाग असला तरी त्यातील निरुपण, निवेदन, बतावणी यातून लोकमनाशी संवाद करीत करीत सहजपणे प्रबोधन घडविले जाते.
काळाच्या ओघात त्या लोककला लोप पावत चालल्या आहेत. विविध माध्यमातून आणि उपक्रमातून समाजाला संस्कारित करणा‍र्‍या संस्कारभारतीने या (2009) दैनंदिनीद्वारा लोकजीवन घडविणार्‍या लोककलांचा                       परिचय करुन दिला आहे. ह्या उपक्रमाचेही आपण मनःपूर्वक स्वागत कराल, यात शंका नाही.

- डॉ.रामचंद्र देखणे.



विविध लोककलाकारांची 
रंगभूषा, वेषभूषा, साहित्य, वाद्य



वासुदेव -

रंगभूषा : साधी, कपाळाला गंध, डोक्यावर मोरपिसांची शंखाच्या आकाराची टोपी, पायात घुंगराचे चाळ.
वेशभूषा : धोतर, घोळदार अंगरखा, उपरणं, काखेत झोळी, कमरेला शेला.
साहित्य : बासरी - कमरेला खोचलेली.
वाद्य : टाळ, चिपळ्या.

पोतराज -

रंगभूषा : मानेपर्यंत मोकळे केस, कपाळी कुंकवाचा मळवट, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, गळ्यात हिरव्या बांगड्यांची माळ, पायात खुळखुळ्याच्या स्वरुपाचे मोठे तोरडे, गळ्यात लक्ष्मी आईचा तांब्यांचा किंवा पत्र्याचा टाक, हातात दंडात कडं, मिशा.
वेशभूषा : धोतर, त्यावर रंगीबेरंगी खण बांधणे, कमरेला घागर माळ.
साहित्य : एकीकडे नारळासारखा आणि दुसरीकडे निमुळता होत जाणारा ३-४ इंच व्यासाचा कोरडा.
वाद्द : टाळ, चिपळ्या, पेटी, तबला

गोंधळी-

रंगभूषा :  साधी
वेशभूषा :  चुस्त पायजमा किंवा धोतर, पायघोळ झगा

रेणुराई -

रंगभूषा :गळ्यात माहुरच्य देवीचा टाक, कवड्यांची माळ, प्रत्येकी कवडीआड एक रेशमी गोंडा, कंगणीदार पगडी, कमरेला उपरणे, पायात घुंगरु, पोत दिवटीवर, संबळाला कापडाचा गाझा, संबळ दोन काड्यांनी वाजवतात
वाद्य : संबळ, तुणतुणं
साहित्य : पाच ऊस किंवा ज्वारीची ताटं, तांब्या, नारळ, नागवेलीची पानं, धान्याची रास

कदमराई -

गळ्यात तुळजापुरच्या देवीचा टाक, फ़क्‍त कवड्याची माळ, कवड्यांचा निमुळता शंखाच्या आकाराचा टोप, कमरेला उपरणे, पायात धुंगरु, पोत हातात, गाझा नाही, संबळ एका हाताने, एका कवडीने वाजवतात
वाद्य : संबळ, तुणतुणं
साहित्य : पाच ऊस किंवा ज्वारीची ताटं, तांब्या, नारळ, नागवेलीची पानं, धान्याची रास

वाघ्या-मुरळी -

रंगभूषा : वाघ्या - साधी, मुरळी - साधी, कपाळाला हळद, गळ्यात कवड्याची माळ, अंबाडा
वेषभूषा : वाघ्या - धोतर, सदरा, जाकीट, गळ्यात वाघाच्या कातड्याची पिशवी (त्यात भंडारा म्हणजे हळद)
              मुरळी - नऊवारी पातळ
वाद्य : दिमडी, खंजीरी, तुणतुणं, टाळ, घाटी, डफ़
साहित्य : कोरंबा (वाघ्याचं भिक्षापात्र), तांबड वस्त्र, सव्वाशेर धान्य, दोन तांबे, नागवेलीची पानं, दोन नारळ, पाच ऊसफ़ुलांच्या माळा, पुर्‍या सोटार्‍यां, कडाकणीचा फ़ुलोरा.

लावणी -

रंगभूषा : स्त्री - थोडासा भडक मेकअप अंबाडा, त्यावर गजरा
पुरूष : साधी रंगभूषा.
सोंगड्या - स्त्री पेक्षा कमी भडक.
वेषभूषा - स्त्री-नऊवारी जरीच पातळ, गळ्यात, कानात, दंडात अलंकार, पायात चाळ.
पुरुष - पटका, चुस्त पायजमा सदरा.
वाद्य - ढोलकी, तुणतुणं, कडी, पेटी.

पोवाडा -

रंगभूषा - साधी.
वेशभूषा - पटका, चुस्त पायजमा, सदरा किंवा बाराबंदी, कमरेला झोला.
वाद्य - तुणतुणं, कडी, ढोलकी, डफ, खंजिरी.



Tuesday, August 2, 2011

सांप्रदायिक हिंसाविरोधी विधेयक

या कायद्याचे नाव "सांप्रदायिक हिंसाविरोधी' असे असले तरी तो केवळ दंगलीच्यावेळी नाही तर सर्व काळ व सर्व स्थानी लागू असेल. या कायद्यान्वये अत्याचार झाल्याची तक्रार करणारा फिर्यादी हा केवळ अल्पसंख्याकच असेल व आरोपी हा बहुसंख्यांकच असेल. दोन अल्पसंख्यांक समाजातील वाद, मारामारी, दंगली यांना हा कायदा लागू होणार नाही.

 हा कायदा म्हणजे अल्पसंख्यांकांनी बहुसंख्यांकांना वेठीला धरण्यास दिलेली घटनात्मक मान्यता असून हा कायदा पारित झाला तर अल्पसंख्यांकांच्या मर्जीवर बहुसंख्यांकांना जगणे भाग पडेल व हे बहुसंख्यांक म्हणजे केवळ हिंदू. कारण स्वतंत्र भारतात ज्या काश्मीरच्या खोऱ्यात हिंदूंवर सर्वाधिक अत्याचार झाले तिथे हा कायदा लागू नाही व पूर्वोत्तर राज्यात जिथे हिंदू अल्पसंख्य आहेत तिथेही हा हिंदूंनाच लागू, कारण देशभरात हिंदूंची बहुसंख्या आहे म्हणून.



या कायद्यात काय आहे?
गुन्ह्याला जात नसते, धर्म नसतो असे म्हणण्याची प्रथा आहे व कायद्यापुढे सर्व समान हे आपल्या घटनेचे तत्त्व आहे, असे आपण सांगत असतो. या दोन्ही तत्त्वांना या कायद्याने हरताळ फासला जाणार असून केवळ बहुसंख्यांक समाजाने केलेल्या गुन्ह्याचीच हा कायदा दखल घेणार आहे. म्हणजे खून, बलात्कार, मालमत्तेचे नुकसान, धार्मिक द्वेष पसरवणे, आर्थिक बहिष्कार इ. गुन्हे हे अल्पसंख्याकांनी केले तर ते या कायद्याच्या कक्षेत येणार नाहीत, परंतु एखाद्या बहुसंख्यांक व्यक्तीवर किंवा गट, संस्थेवर असे गुन्हे केल्याचा आरोप जरी केला तरी त्यावर कारवाई करणे भाग आहे. त्यातील आरोपींना जामीन मिळू शकणार नाही, त्यांची संपत्ती जप्त होऊ शकते. या आरोपात तथ्य नाही, असे पोलिसांना वाटले तरी त्याचा उपयोग नाही, कारण जर त्यांनी तक्रारीवर कारवाई केली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. 

घटनाबाह्य प्रक्रिया
 या कायद्यात मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे राष्ट्रीय प्राधिकरण करण्यात येईल त्यातील सातापैकी चार अल्पसंख्यांक असतील व अध्यक्ष व उपाध्यक्ष हे अल्पसंख्यांकच असतील. चौकशी, खटला भरणे, ते चालवणे, झडती घेणे, अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रसारमाध्यमांवर नियंत्रण ठेवणे असे व्यापक अधिकार दिले असून या कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली म्हणून त्याविरुद्ध किंवा सरकारविरुद्ध कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही.
या कायद्याचे नाव "सांप्रदायिक हिंसाविरोधी' असे असले तरी तो केवळ दंगलीच्यावेळी नाही तर सर्व काळ व सर्व स्थानी लागू असेल.
या कायद्यान्वये अत्याचार झाल्याची तक्रार करणारा फिर्यादी हा केवळ अल्पसंख्यांकच असेल व आरोपी हा बहुसंख्यांकच असेल.
दोन अल्पसंख्यांक समाजातील वाद, मारामारी, दंगली यांना हा कायदा लागू होणार नाही.
हा कायदा झाला तर त्या अंतर्गत पुढील विषयावर खोट्या तक्रारी टाकल्या जाऊ शकतात. धार्मिक द्वेष पसरवणे, अल्पसंख्यांकांचा सामाजिक व आर्थिक बहिष्कार, धार्मिक आधारावर अपमान करणे, घर भाड्याने अथवा विकत न देणे, नोकरी न देणे, शिक्षणापासून वंचित ठेवणे, आरोय सेवा न पुरवणे, वाहनात न बसणे / किंवा न बसू देणे, दुकानातून माल न विकत घेणे किंवा देणे इ.
भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पूर्णपणे गदा येईल व बहुसंख्य समाज मोकळेपणाने आपले विचार मांडू शकणार नाही, किंवा कोणावर टीकादेखील करू शकणार नाही.
काही समाजातील लोकांची बहुसं"याकांविरुद्ध गुन्हे करण्याची हिंमत खूप वाढेल कारण या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर तक्रारीच टाकता येणार नाहीत.
हिंदू संत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे हिंदू नेते - यांच्या कामावर प्रतिबंध येतील.
वैयक्तिक दुश्मनी व राजकीय सूड घेण्यासाठी या कायद्याचा वापर केला जाऊ शकतो.
वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अठरा पगड जातीच्या व विविध प्रांतांच्या भारतीयांमध्ये तणावाचे व भयाचे वातावरण निर्माण होऊन त्यांचे जीवन फार कठीण होईल.
बहुसं"याकांकडून पैसे (ब्लॅकमेल करून) काढणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या निर्माण होऊ शकतील.
आपण जन्माने हिंदू आहोत हाच आपला मोठा गुन्हा आहे अशी भावना हिंदूमध्ये निर्माण होऊन धर्मांतराचे प्रमाण वाढेल.




विरोध आवश्यक
या विधेयकाचा मसुदा वाचल्यानंतर असे लक्षात येते की हा तुघलकी कायदा म्हणजे मतपेढीचे राजकारण व अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाचे व लांगूलचालनाचे सर्वात घाणेरडे उदाहरण आहे. असे जुलमी कायदे फक्त पूर्वाश्रमीच्या दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया राजवटीत निग्रो विरुद्ध केले गेले होते.
या कायद्याचा मसुदा तयार करताना दहशतवादी व अन्य गंभीर गुन्हेगारी कायद्यातील कडक कलमे जशीच्या तशी उचलली आहेत. उदा. टाडा (जो या सरकारने रद्द केला), मोक्का, अमली पदार्थ विरोधी कायदा व अनलॉफूल ऍक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) ऍक्ट.
आता यावर एकच पर्याय शिल्लक आहे व तो म्हणजे जनआंदोलनाद्वारे लोकजागृती करून सरकारवर दबाव आणणे.


या विधेयकातील काही भयानक व एकतर्फी तरतूदी..........


सविस्तर वाचा >> http://www.evivek.com/current/lekh001.html

श्री मोहनजी भागवत, सरसंघचालक रा.स्व.संघ के विचार : 





सुदर्शन टीवी ने किया इस बिल का पर्दाफाश : 




Friday, July 15, 2011

मुंबईवर आतंकवादि हल्ला आणि एक सामान्य माणुस


मुंबईवर आतंकवादि हल्ला आणि एक सामान्य माणुस


मुंबईत पुन्हा आतंकवादि हल्ल्याची बातमी आली आणि माझ्या पोटात भितीचा गोळा आला. एकाच वेळी तीन-तीन ठिकाणि बाँब स्फ़ोटाने मुंबई पुन्हा विदिर्ण झाली ! सर्वत्र एकदम गोंधळ माजला. न्युज चॅनल्स वर एकच विषय " मुंबईवर पुन्हा आतंकवादि हल्ला ! "

राहुल गांधी म्हणतो कि "...असे हल्ले रोखणे शक्य नाहि. असे हल्ले अफ़गाणिस्तान मधे होतच राहातात......"

या महाशयांना काय म्हणायचय ?
 

असं म्हणण म्हणजे आतंकवादि हल्ल्यात बळी गेलेल्या सामान्य माणसांचा (कॉमन मॅन) अपमान नाहि का ?
कि यांना सामान्य व्यक्तिंशी(कॉमन मॅनशी) काहि घेण-देणंच नाही ?
भारताची तुलना अफ़गाणिस्तान सारख्या देशाची तुलनाच कशी करु शकतात ?

पहा ! असे आहेत भारताच्या भावि पंतप्रधानांचे (?) विचार.

हो रहा भारत निर्माण (?). ..


दुर्दैव !

पण मला खात्रि आहे माझे दक्ष पोलिस आपली कामगीरी चोख बजावतिलच. जिवाची बाजी लावुन जसे संसदेवर हल्ला करणार्‍या अफ़जल गुरु किंवा ताज हल्ल्यातिल अजमल कसाब ला पकडलेच. त्याप्रमाणेच दादर, ओपेरा हाऊस, आणि झवेरीबाजारच्या हल्लेखोरांनाहि लवकरच पकडतिल.

मग त्यानंतर काय ? वर्षानु वर्षे न्यायालयात खटले चालणार, माननिय न्यायमुर्त्ति आतंकवाद्यांना शिक्षा ठोठावणार, अगदि तसच ज्याप्रमाणे अफ़जल गुरु आणि कसाब च्या बाबतित घडले. आणि त्यानंतर हि अगदि तसेच निव्वळ राजकिय स्वार्थासाठी शिक्षेची अंम्मलबजावणि मात्र घडणार नाहि, त्यांना सरकार  जावई करुन घेईल. त्यांच्यावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येईल. ज्यांनी अनेक निरपराध  जनतेचे प्राण घेतले त्याच्यासाठी शाहि थाट !..........बाप रे !

भारत ' सोने कि चिडिया ' असला तरिहि या देशात रहाणारा मी एक सामान्य माणुस अतिशय गरिब आहे. "अतिथि देवो भव " अशी आमची संस्कृति असली तरिहि अशा आतंकवाद्यांच्या सरबराईत ठेवण्यासाठि होणारा प्रचंड खर्च माझ्या खिशाला परवडणारा नाहि. त्यामुळे कर्तव्य दक्ष पोलिसांना विनंति आहे कि, "कृपया तुम्ही तरि माझा (सामान्य माणसाचा) विचार करा. त्या अतिरेक्यांना किमान जिवंत पकडण्याच्या भानगडीत पडु नका. कारण त्यांना जिवंत पकडल्यानंतर पुन्हा तेच पहिले पाढे पंन्नास.

प्रश्न असा पडतो कि ......
  1. एवढि सतर्क सुरक्षा यंत्रणा असताना हे आतंकवादि घुसतातच कसे ?
  2. हल्ले फ़क्‍त हिंदु बहुल परिसरातच का होतात ?
  3. आतंकवादि हल्ल्यांमधे फ़क्‍त हिंदुच का मरतात ?
  4. नविन येणारा दंगल विरोधि कायद्या नुसार जर हिदु दंगलखोर/आतंकवादि वृत्तिचा आहे, तर होणारे आतंकवादि हल्ले हिंदु वस्त्यांमधेच का होतात?
  5. मग असा कायदा करुन सरकार हिंदुंवर इंग्रजांप्रमाणे आत्याचारकरत नाहि का?
  • नुकताच झालेला आतंकवादि हल्ला खरच आतंकवादि हल्ला होता का ?
  • कि सध्या चालु असलेला काळा पैसा, भ्रष्टाचाराच्या मुख्य विषया पासुन लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा सत्ताधार्यांचा केविलवाणा प्रयत्न होता ?
कारण ४ जुलै २०११, रामदेव बाबांचे आंदोलन दडपण्या साठि झोपलेल्या लोकांवर, मध्य रात्रि च्या वेळी सरकार ने जो अत्याचार केला,अगदि जालियनवाला बाग ची आठवन ताजी होते. त्यावरुन सरकार कोणत्या थराला जाऊ शकते हे आपल्याला लक्षात आलेच आहे.

याचा आपण सर्वांनी आवश्य विचार करावा


-एक सामान्य माणुस

Friday, July 1, 2011

Social service programs by Hindu Sanghatans

हिन्द्व: सोदर: सर्वे न हिंदु पतितो भवेत ।
हिंदु रक्षाम मम दिक्षाम मम मंत्र समानता: ॥ 



Vishwa Hindu Parishad (VHP):

Balwaries 149
Bal Sanskar Kendras 973
Primary Schools 596
Secondary Schools 156
Senior Secondary Schools 53
Residential Schools 15
Hostels - Boy's/Girl's 104
Night Schools1
Coaching - Centres37
Libraries112
Sanskrit & Ved Pathshalas 6
Other Educational Projects 36
Total 2238


There are more 80 million children in Bharat, who are illiterate and have no chance of going to any school. VHP. has been encouraging our institutions to take of illiteracy programme in a big way. Schools have been started in remote tribal and rural areas. More than One lakhs children are studying in our schools in Banswara, Rajasthan. Schools have been started in Manipur, Tripura, Meghalaya, Jharkhand, Assam, Rajasthan, and Andhra Pradesh. The result is that tribal boys are joining our schools in a big way.

(A) SCHOOL :

Vishva Hindu Parishad is running more than 596 primary schools, 156 secondary schools and 23 senior secondary schools catering to the need of nearly 1.5 lakh Tribal students in various States. 15 Residential schools are run in Assam, Tripura, Jharkhand, West Bengal, Rajasthan, Uttar Pradesh, Maharashtra and Andhra Pradesh for the students hailing from remote areas. More than 25,000 children are studying in 177 schools in Banswara alone. Knowledge of our age-old culture, teaching in Sanskrit and training in Yoga is imparted at all these schools.

(B) ASHRAM AND ASHRAMSHALA :

There are 10 Ashrams and 12 Ashramshalas. The Ashrams are mainly in West Bengal and Ashramshalas in Gujarat, Maharashtra, UP and Orissa. The ashrams are like Gurukuls and include Temples, Balwaries, Primary Schools and Satsang Kendras, whereas Ashramshalas are like hostels for pre-primary Tribal children supported by the State Governments.

(C) BAL SANSKAR KENDRA AND BALWARIES :

Bal Sanskar Kendras are given different names in different States i.e., Shishu Vihar, Shishu Mandir, Balwaries (Bal Sanskar Kendra). Children drawn from different strata of society are allowed to mix together to create feelings of brotherhood and love amongst themselves. Books on Bal Sanskar have been published for the guidance of Teachers of Bal Sanskar Kendras in different languages. There are about 1200 Balwaries & Bal Sanskar Kendras out of which West Andhra has 175, Vidarbh 135 and Konkan 72. In Tamilnadu, during Krishna Janmashtami celebrations, more than 400,000 children from different centres dress up in various forms of Krishna recite Bhakti songs & verses from Geeta. About 38,000 children are being trained all over Bharat through these Balwaries & Bal Sanskar Kendras. This includes 30 crèches for the children of working and ailing mothers in Tamilnadu.
Examinations in Bhartiya culture are regularly conducted in most of the 600 schools & 150 Junior Colleges in Karnataka since the past 25 years, in which a large number of students take part every year.

(D) PROPAGATION OF SANSKRIT AND VEDAS :

Sanskrit, the oldest and the richest language in the world is the base of Hindu Culture. VHP has taken up the propagation of Sanskrit along with its other activities. With a view to make Sanskrit a Jan-bhasha (Common spoken language), arrangements are being made to teach simple Sanskrit within a short period of 10 days. Camps are being organized in various States for the teaching of spoken Sanskrit in daily life. Postal lessons in Sanskrit are also provided in Andhra Pradesh and Karnataka. More than 50,000 people have completed this course and many more are doing the course. Lessons from books specially designed for this purpose are being taught in our Schools. Subjects like Vedic Mathematics, Astrology, Astronomy and use of Sanskrit in Computer are also taught in these schools.

(E) SUPPORT-A-CHILD :

Under our “Support-A-Child” Scheme, donors from USA, UK & Canada, have adopted students living in our hostels. Our friends in the USA alone have been supporting more than 800 Tribals and orphans living in our hostels and Sewa International of the United Kingdom under Education Aid Program is aiding for the education of 600 such children.

To Name A Few :

Wednesday, June 29, 2011

सावरकरांचे आंबेडकरांना आमंत्रण

सावरकरांचे आंबेडकरांना आमंत्रण:

श्रीयुत डा.आंबेडकर यासी,

महाशय,

गेली पाच-सहा वर्षे रत्नागिरी नगरात पोथीजात जातिभेदोच्छेदक आंदोलन बर्याच मोठ्या प्रमाणावर चालू आहे.आपल्या हिंदुधर्माच्या नि हिंदुराष्ट्राच्या मुळासच लागलेली ही जन्मजात म्हणविणार्या पण पोथीजात असणार्या जातिभेदाची कीड मारल्यावाचून तो संघटित नि सबळ होऊन आजच्या जीवनकलहात टिकाव धरू शकणार नाही,याविषयी मलाही मुळीच शंका वाटत नाही.आपल्याप्रमाणेच नि आपल्या इतक्याच स्पष्ट शब्दात मी अस्पृश्यता प्रभृति अन्याय्य,अधर्म्य नि आत्मघातक अशा अनेक रूढींची ब्याद पसरविणार्या या जन्मजात जातिभेदास निषेधीत आलो आहे.सोबत माझे दोन तीन लेखही धाडीत आहे:वेळ झाल्यास पाहावेत.

परंतु हे पत्र मी जातिभेदाविषयी शाब्दिक निषेध वा चर्चा करण्यासाठी धाडीत नाही. या पिढीत हा जातिभेद मोडण्यासाठी हिंदु समाज प्रत्यक्ष कार्य असे कोणते करु इच्छितो याची काही सक्रिय हमी,प्रत्यक्ष पुरावा,मनोवृत्ती पालटल्याची निर्विवाद साक्ष आपणांस हवी आहे,असें आपण मसूरकर महाराजांशी झालेल्या भेटीत बोलल्याचे समजते. अस्पृश्यता व जातिभेद मोडण्याचे दायित्व स्पृश्यांवरच काय ते नाही. अस्पृश्यंतही अस्पृश्यता नि जातिभेद यांचे प्रस्थ स्पृश्यांइतकेच आहे.

भट नि भंगी जातिभेदाच्या पापाचे भागीदार असून मनोवृत्ती पालटल्याची साक्ष दोघांनीही एकमेकांना दिली पाहिजे.

दोघांनी मिळून हे पाप निस्तरिले पाहिजे.

दोष सगळ्यांचा,प्रमाण काय ते थोडे फार.

अर्थात जातिभेद मोडण्याचे प्रत्यक्ष कार्य तिथेच उत्कटपणे नि यथार्थपणे झाले असे म्हणता येईल की,जिथे ब्राह्मण मराठेच महाराबरोबर जेवत नाहीत ,तर महारही भंग्याबरोबर जेवतो.

जाति-अहंकाराच्या प्रपीडक वृत्तीपासून महारही इतका मुक्त नाही की,त्यांनी केवळ स्पृश्य वर्गापासूनच काय तो मनोवृत्ती पालटण्याविषयी सक्रिय पुरावा मागण्याचा निरपराधी अधिकार गाजवू पहावा हे माझ्याप्रमाणेच आपल्याही अनुभवास पदोपदी आलेले असेल.

नुसती शाब्दिक सहानुभूति नको.आता सक्रिय हमी काय देता तें रोखठोक करुन काय तें करून दाखवा ?हे आपले मागणे न्याय्यच नव्हे तर उपयुक्तही आहे.

मीही गेल्या पाच-सहा वर्षांपासून’रोख-ठोक हेच काय ते कार्य’ हे सूत्र हिंदुराष्ट्रापुढे इतर

प्रकरणी तसेच सामाजिक क्रांतीविषयीही ठेवत आहे.

तें सूत्र व्यवहारविण्याचा नि जन्मजात जातिभेद प्रत्यहीच्या आचरणात तोडून दाखविण्याचा प्रयोग माझ्या मते रत्नागिरी नगरात मोठ्या प्रमाणात नि त्याखालोखाल मालवण नगरात यशस्वी झाला आहे.

प्रयोग हा प्रयोगशाळेतील एका कोपर्यात जरी यशस्वी झाला; तरी त्यामुळे सिद्ध होणारी शक्यता नि नियम हे सर्वसामान्य असल्याने तो त्या प्रमाणात यशस्वीच समजला पाहिजे.

यासाठी आपण मागितलेला सक्रिय पुरावा,’काय करता ते दाखवा’ची मागणी,रत्नागिरीचा जाति-उच्छेदक पक्ष आपल्यांपुरती तरी आपणांस कृतीनेच देऊ इच्छित आहे.

यास्तव त्या पक्षाच्या वतीने हे आमंत्रण मी आपणांस धाडीत आहे.

जातिभेद तोडण्याचा बहुतेक व्यावहारिक कार्यक्रम रोटीबंदी तोडण्यात सामावलेला असतो.

जो रोटीबंदी तोडतो तो वेदोक्तबंदी वा स्पर्शबंदी तोडतोच तोडतो.

बेटीबंदी तेवढी उरते,पण ती काही प्रत्येकी प्रत्येकाला तोडण्याची गोष्ट नव्हे.

वधूवरांचाच तो पृथक प्रश्न.

इतरांनी तसा मिश्रविवाह धर्मबाह्य वा बहिष्कार्य मानला नाही नि त्या जोडप्यास इतर विवाहितांप्रमाणेच संव्यवहार्य मानलें,म्हणजे संपले.

यास्तव जातिभेद व्यवहारात तोडीत असल्याचा कोणत्याही वेळी,घाऊक प्रमाणात झटकन देता येईल असा,निर्विवाद पुरावा म्हणजे त्यातल्या त्यात रोटीबंदी प्रकटपणे तोडून दाखविणे हाच होय.

हें ध्यानात घेऊन आपल्या आगमनाचे प्रसंगी साधारण कार्यक्रम ठेऊ.


  1. आपण एका पंधरवड्याचे आत-बाहेर सवडीप्रमाणे रत्नागिरीस यावे.येण्याचे आधी एक आठवडा आगाऊ कळविण्याची तसदी घ्यावी.

  2. पतितपावनामध्ये देवळाच्या भर सभामंडपात सरासरी एकहजार ब्राह्मण,मराठा,वैश्य,शिंपी,कुळवाडीप्रभृति अनेक स्पृश्य मंडळींचे ,प्रतिष्ठित प्रमुख नागरिकांपासून,तो कामकर्यांपर्यंत सर्व वर्गांचे स्पृश्यांसह ज्यांत अस्पृश्य महार,चांभार मंडळी जेवतात इतकेच नव्हे तर महार,चांभार,मंडळी भंगीबंधूंसहित सरमिसळ पंगतीत बसतात --असे टोलेजंग सहभोजन आपल्या अध्यक्षतेखाली होईल.अशी सहभोजनें श्री राजभोज,पतितपावनदास सकट इत्यादि पूर्वास्पृश्यांचे समक्ष नि सह अनेकवार झाली आहेत.

  3. आपली इच्छा असल्यास स्त्रियांचेही एक सहभोजन होईल.त्यात ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्यादिक प्रतिष्ठित कुटुंबातील स्त्रिया -प्रौढ नि तरुण-आपल्या महार,चांभार,भंगी प्रभृति धर्मभगिनींच्यासह पंगतीत सरमिसळ जेवतील.

  4. या सह्भोजकांची नांवे प्रकटपणे वर्तमानपत्री प्रसिद्धिली जातील.ही अट मान्य असणारासच सहभोजनांत घेतले जाईल.

  5. येथील भंगी कथेकर्याची किंवा आपणासोबत कोणी सुयोग्य पूर्वास्पृश्य कथेकरी येतील तर त्यांची कथा रात्री होईल.देवळात इतर कथेकर्यांप्रमाणेच त्या भंगी कथेकर्यास ओवाळून रीतीप्रमाणे त्याचे पायीही शेकडो आब्राह्मण-चांभार[ब्राह्मणांपासून चांभारापर्यंत] मंडळी दंडवत करील.श्री.काजरोळकर यांचा तसा सन्मान गेल्या गणेशोत्सवी केला होता.

  6. आपली इच्छा प्रतिकूल नसल्यास आपलेही एक व्याख्यान व्हावे असा मानस आहे.

  7. कार्यक्रमाची जागा पतितपावन मंदिर,श्रीमंत भागोजी शेट कीरांच्याच सत्त्तेचे आणि सहभोजनादिक प्रकरणी अनुकूल तेच भाग घेणार.त्यामुळे तिसर्या कोणाचाही संबंध तिथे पोहचणार नाही.आणि म्हणूनच नैर्बंधिक[कायदेशीर] अशी कोणतीही अडचण येण्याचा संभवसुद्धा नाही.

  8. हो,सर्वात महत्वाची गोष्ट अशी की,अशी लहान मोठी दीड्शेवर सहभोजने इथे झाली असताही नांवे छापून भाग घेणार्या हजारो सहभोजकांपैकी कोणाच्याही जातीने कोणासही जातिबहिष्कार्य ठरवलेले नाही.उलट सहभोजन हवे त्याने केले वा केले नाही,तरी तो प्रश्न ज्याचात्याचा,ते जातिबहिष्कार्य कृत्य नव्हेच हेंच आज येथील धर्मशास्त्र होऊन बसले आहे! ती वस्तुस्थितीही आपण समक्ष अवलोकालच.
    • हा कार्यक्रम झाला म्हणजे हा राष्ट्रीय प्रश्न सुटला असे मानण्याइतका कोणीही मूर्ख नाही.पण तशाने वार्याची दिशा कळते;आपणास काही सक्रिय आरंभ हवा आणि जर सहा हजार वर्षांच्या बलवत्तर रूढी सहा वर्षांत एवढ्या प्रमाणावर इथे केवळ मन:प्रवर्तनाने मोडता येतात तर इतरत्र येतीलही अशी निश्चिती वाटण्यास हरकत नाही,-एवढ्याचसाठी आम्ही हे आमंत्रण देत आहोत.

    • आम्ही हिंदु,आपण हिंदु या पिढ्यान्पिढ्याच्या धर्मबंधुत्वाच्या स्मरणासह हृदयात जे उत्कट ममत्व उत्पन्न होते त्या ममत्वाने हे अनावृत प्रकट निमंत्रण धाडीत आहे.

    • आपला माझा काही वैयक्तिक स्नेहही आहेच.त्या स्नेहासाठी म्हणून तरी हे प्रेमपूर्वक आमंत्रण स्वीकारावे.

    • आमच्या पक्षाच्या दोघा तिघा प्रमुख पुढार्यांच्या सह्या ह्या पत्रावर त्यांच्याही उत्कट इच्छेस्तव घेऊन हे पत्र धाडीत आहोत.


कळावें लोभ असावा ही विनंती.

- वि.दा.सावरकर

- डा.शिंदे

- रा.वि.चिपळूणकर (M.A. LL.B.)

- दत्तोपंत लिमये (B.A.,LL.B.)

- संपादक,सत्यशोधक



पुनश्च:-


या पत्रातील आमंत्रण स्वीकारण्याची इच्छा आपण उत्तरी दर्शविल्यास येथील जातिउच्छेदक पक्षीय शम्भर प्रमुख नि प्रतिष्ठित अशा सर्वजातीय नागरिकांच्या सह्यांचे प्रकट आमंत्रणही आपणांस रीतसर धाडू.कळावे.लो.अ.ही वि.

आपला,

- वि.दा.सावरकर

[निर्भीड,दि.१७/११/१९३५]



डा.आंबेडकरांनी खालील उत्तर धाडले-


’रत्नागिरीला आपण जे कार्य करीत आहात त्याची माहिती वाचून आनंद होत आहे.येथील ला कालेजच्या कामामुळे मला आपल्या आमंत्रणाचा लाभ घेता येत नाही याविषयी खेद वाटतो.’

[सकाळ-दि.२४-११-१९३५]

Saturday, March 19, 2011

पानिपत : यशाचे अपयशात रूपांतर

पानिपत २५० वर्षे


मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे - रविवार, ९ जानेवारी २०११

पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण! २५० वर्षे झाली तरी इतिहासातील हा धडा युद्धनीतीत महत्त्वाचा मानला जातो.

देशाच्या इतिहासात असा एखादा दिवस येतो तेव्हा काही तासांतच त्याच्या वर्तमानात आणि भविष्यामध्ये पराकोटीची उलथापालथ होते. ऑगस्ट- १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने बेचिराख केली, तेव्हा जपानची अशी स्थिती झाली होती. १४ जानेवारी १७६१ हे भारताच्या इतिहासातील असेच एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.

दुर्दैवाने त्या लढाईत मराठा सैन्याचा निर्णायक पराभव झाला. त्याचा मराठी मानसावर झालेला आघात इतका जबरदस्त आहे की, कोणत्याही असीम अपयशाला ‘पानिपत झाले’अशी उपमा दिली जाते. ही मानसिकता पुसून टाकणे आवश्यक आहे.

१४ जानेवारी १७६१ या दिवशी सकाळी आरंभ झालेल्या लढाईत मध्यान्हीपर्यंत विजयाचे पारडे मराठय़ांकडे झुकत होते; परंतु काही तासांतच फासे पलटले आणि उन्हे कलण्याच्या वेळेपर्यंत मराठा सेनेचा धुव्वा उडाला. भाऊसाहेब पेशवे आणि विश्वासराव हे सरसेनापती धारातीर्थी पडले. इब्राहिम गार्दी आणि जनकोजी शिंदे वगैरे धुरंधर शत्रूच्या हातात पडले. अनेक सेनापती आणि सरदार कामी आले. दोन्ही बाजूंचे पन्नास-साठ हजार सैनिक ठार झाले आणि लाखांवर निष्पापांची कत्तल झाली.

पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन तीन शब्दांत करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण!

युद्धविजयी घटक


प्रत्येक लढाईचे लष्करी इतिहासाच्या दृष्टिकोनातून निष्पक्ष परीक्षण होणे आवश्यक आहे. सैनिकी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात त्यांचा मोठा वाटा असतो. कोणतीही लढाई ही आधी घडलेल्या लढायांची पुनरावृत्ती असता कामा नये. युद्धातील प्रतिस्पध्र्याच्या प्रहारक्षमतेचे दोन प्रमुख घटक असतात- बल आणि बलगुणक. बल म्हणजे फौजफाटा, तोफा, घोडदळ वगैरे. बलगुणक (Force Multipliers) या लढाऊ क्षमता द्विगुणित करणाऱ्या गोष्टी.. सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती, सैन्याच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता, रसदव्यवस्था, नेतृत्वाचा कस, शाठय़ आणि विस्मय या युद्धतंत्रांचा परिणामकारक वापर- हे काही बलगुणक. युद्धाचा निकाल म्हणजे दोन घटकांचे अजब आणि वैचित्र्यपूर्ण रसायन असते. त्यात भर पडते ती आणखी एका अनपेक्षित घटकाची- अतक्र्यता. कधी निसर्गातील अचानक बदल, तर कधी अगम्य घटनांमुळे युद्धाच्या यशापयशावर होणारा कल्पनातीत परिणाम. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत या घटकांचा अफलातून खेळ कोणत्याही वाचकाला अचंबित आणि मंत्रमुग्ध करून सोडतो.

लढाईपूर्व घटना


जानेवारी-१७५७ मध्ये भारतीय अफगाणी सरदार नजीब उद्दौलाच्या निमंत्रणावरून अफगाण राजा अहमदशहा अब्दालीने भारताची मोहीम हाती घेतली. त्याचा उपकर्ता नादीरशहाच्या मृत्यूनंतर त्याने सत्ता बळकावली होती. नादीरशहाबरोबर तो त्यापूर्वी भारतात आला होता. दिल्लीपर्यंत मजल मारून बारा करोड रुपयांची लूट घेऊन तो एप्रिल-१७५७ मध्ये स्वदेशी परतला. दरम्यान, राघोबादादा पेशव्यांनी जंगी फौजेसह नोव्हेंबर-१७५६ मध्ये उत्तरेकडे कूच केले. ऑगस्ट-१७५७ मध्ये दिल्लीला पोहोचेपर्यंत अब्दाली परतला होता. दिल्लीची सल्तनत पुनश्च स्थिरस्थावर करून त्यांनी १७५८ मध्ये अटकेपर्यंत भरारी मारली. त्यात नजीब उद्दौला त्यांच्या हातात सापडला, परंतु मल्हारराव होळकरांनी आपल्या या मानसपुत्राला जीवदान देण्याची गळ घालून नजीबला सोडणे भाग पाडले. ही घोडचूक ठरली.

१७५९ मध्ये मराठय़ांचे उत्तर हिंदुस्थानातील वर्चस्व आणि दिल्लीवरील भक्कम पकडीमुळे अस्वस्थ झालेल्या अब्दालीने हिंदुस्थानकडे पुनश्च मोर्चा वळवला. १० जानेवारी १७६० रोजी शुक्रतालच्या लढाईत पेशव्यांचा अग्रणी सरदार आणि उत्तर हिंदुस्थानातील प्रतिनिधी दत्ताजी शिंदे ठार झाला. अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी फौज धाडण्याचा निर्णय नानासाहेब पेशव्यांनी घेतला. त्यानुसार त्यांचे चुलतबंधू सदाशिवराव भाऊसाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ साठ-सत्तर हजारांची फौज मार्चमध्ये उत्तरेकडे रवाना झाली. त्यात वाटेत मिळालेल्या शिंदे, होळकर यांच्या तुकडय़ाही होत्या. फौजेत चाळीस हजाराचे घोडदळ आणि इब्राहिम गार्दी या धुरंधर तोफचीच्या नेतृत्वाखाली आधुनिक २०० फ्रेंच तोफांचा तोफखाना होता. फौजेबरोबर लाख-दीड लाख बुणगे आणि चाळीस-पन्नास हजार यात्रेकरू होते. इतक्या मोठय़ा फौजेच्या दिमतीसाठी काही हजार बुणग्यांची निश्चित आवश्यकता होती; परंतु दीड लाखांची संख्या मर्यादेबाहेर होती. यात्रेकरूंचा लवाजमा तर नाहक होता. ही दोन्ही लोढणी मराठा सैन्याला प्राणघातक ठरली.

संथ चालीने ऑगस्ट-१७६० मध्ये मराठा सेना दिल्लीत पोहोचली. पंजाब-सिंधमधील चौथाई रक्कम अब्दालीने हडप केल्यामुळे भाऊंना पैशाची चणचण भासली. दिल्ली आणि आसपासचा मुलूख लुटण्याची परवानगी देण्याशिवाय त्यांना पर्याय राहिला नाही. शीख आणि जाट सरदारांना हे रुचले नाही. त्यामुळे त्यांच्या तुकडय़ा मराठा सेनेत सामील झाल्या नाहीत. बुणगे आणि यात्रेकरूंना आश्रय देण्याची तयारी मराठय़ांचा सहयोगी सरदार सूरजमलने दाखविली होती; परंतु भाऊंनी त्याला नकार दिला. या दोन्ही घटनांचे दूरगामी परिणाम मराठय़ांना भोगावे लागले.

पानिपतमधील मोर्चाबंदी


भाऊंनी सप्टेंबर-१७६० मध्ये पानिपतच्या दिशेने कूच केले. तिथे पोहोचल्यावर पश्चिमेस शहराभोवतीचा खंदक आणि पूर्वेस यमुना नदी यांच्या दरम्यान संरक्षक फळी उभी केली. १७ ऑक्टोबर रोजी पानिपतच्या उत्तरेला कुंजपुरा येथील अब्दालीच्या सैन्याच्या तुकडीवर मराठा सरदार विंचूरकरांनी यशस्वी हल्ला चढविला आणि कुंजपुरा काबीज केला. त्यावेळी पकडलेले एक हजार अफगाण सैनिक मात्र त्यांनी आपल्या शिबिरात ठेवून घेतले आणि त्यांचा युद्धात आपल्या बाजूने वापर करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला.

मराठा सेनेची पानिपतजवळील मोर्चाबंदी आणि कुंजपुरा हातातून गेल्याने बिथरलेल्या अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस जाऊन त्यांची कोंडी करण्यासाठी धूर्त आणि दूरगामी डावपेच अमलात आणण्याची महत्त्वाची योजना आखली. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी यमुना ओलांडणे आवश्यक होते; परंतु अडचणींना न जुमानता त्याने २४ ते २६ ऑक्टोबर १७६० ला बाघपत येथे ते साधले आणि तेही मराठय़ांच्या नकळत. अब्दालीचे हे खंबीर पाऊल आणि तीन दिवस चालणारी ही कारवाई वेळेत शोधून न काढण्यातील मराठय़ांच्या टेहेळणीतील गफलत ही मराठा सेनेच्या अपयशाची नांदी म्हटली पाहिजे.

त्यानंतर अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस आपली मोर्चाबंदी केली. त्यामुळे मराठय़ांचे दक्षिणेकडून येणारे रसदमार्ग खुंटले. अब्दालीच्या सैन्याला मात्र अफगाण रोहिल्यांच्या दोआब (अंतर्वेदी) प्रदेशातून रसद मिळत राहिली. एकदा का आपल्या डावपेचाची पूर्तता झाल्यावर अब्दालीने त्याचा पद्धतशीर पाठपुरावा केला आणि वेगवेगळ्या कारवायांकरवी मराठय़ांच्या रसदेचा पूर्णपणे कोंडमारा केला. दिल्लीच्या बाजूने प्रचंड रक्कम घेऊन येणाऱ्या मराठय़ांचे उत्तरेकडील मामलतदार गोविंदपंत बुंदेल्यांची पाळत ठेवून हत्या करण्यात आली. अब्दालीच्या सैन्याचा मराठय़ांभोवतीचा विळखा अधिकाधिक आवळत गेला. गवताच्या प्रचंड साठय़ांच्या गंजींना आग लावण्यात आली. कालव्याचे पाणी अडविण्यात आले. लाख-दोन लाखांच्या बुणगे आणि यात्रेकरूंच्या लोंढय़ामुळे अन्नपुरवठा आणखीनच क्षीण झाला. पानिपतमधील उरल्यासुरल्या नागरिकांचे अन्न हरपल्यामुळे तेही मराठय़ांविरुद्ध जाऊ लागले. डिसेंबपर्यंत माणसे आणि जनावरे अन्नाशिवाय रोडावू लागली. पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या पराजयाचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लढणाऱ्या सैनिकांची अक्षमता नव्हे, तर रसदीची वाण!

व्यूहरचना आणि रणनीती


दोन्ही बाजूंचे सेनाबळ बऱ्याच प्रमाणात समसमान होते. दोन्ही सेनांचे घोडदळ ४०,०००च्या घरात. दुराणी पायदळात काहीसे सरस. मराठय़ांच्या ३०-३५ हजारांसमोर अफगाणी ५०-५५ हजार, तर मराठय़ांचा तोफखाना संख्येत आणि बनावटीत दुराण्यांपेक्षा उजवा. ती कमतरता भरून काढण्यासाठी अब्दालीने उंटावरील हलक्या आणि फिरत्या अशा १००० तोफांची योजना केली होती. या तोफा कमालीच्या प्रभावी ठरल्या. अब्दालीच्या सैन्यात अफगाणिस्तानी आणि हिंदुस्थानी गिलचे सम प्रमाणात होते.

मराठा सैन्य, पश्चिमेस पानिपत खंदक आणि पूर्वेस यमुनेच्या दरम्यान पश्चिम-पूर्व सरळ रेषेत तैनात होते. पश्चिमेस होळकर व शिंद्यांच्या तुकडय़ा, मध्यभागी भाऊ आणि विश्वासरावांची शाही तुकडी आणि पूर्वेस इब्राहिम गार्दी, विंचूरकर आणि गायकवाड वगैरे तुकडय़ा. भाऊंनी राखीव अशी तुकडी मागे ठेवली नव्हती. शीख जाटांच्या अनुपस्थितीमुळे कदाचित त्यांना पायदळाची चणचण भासली असावी; परंतु हा असमर्थनीय प्रमाद होता. अब्दालीने सैन्याची रचना एका तिरकस रेषेत केली होती. अब्दालीचा हिंदुस्थानातील अफगाणी तुकडय़ांवर पूर्ण विश्वास नसावा. म्हणूनच त्याने दोन्ही कडांस अफगाणिस्तानातून आणलेल्या तुकडय़ा उभ्या केल्या होत्या. त्या हिंदुस्थानी अफगाणांवर कडी नजर ठेवण्यासाठी! त्यानुसार शहापसंद पश्चिमेस, त्यानंतर नजीब आणि शुजाउद्दौलाच्या तुकडय़ा, मध्यभागी त्याचा सेनापती शहावलीचा कणा, त्यांच्या पूर्वेस बुंदेखान, सदुल्ला या रोहिल्यांच्या तुकडय़ा आणि सर्वात पूर्वेस बरखुरदार आणि अमीरबेग यांची अफगाणी फौज. या सर्वाच्या दक्षिणेला काही अंतरावर अब्दालीच्या पंधरा हजार राखीव सैनिकांची तुकडी योग्य वेळी आणि ठिकाणी युद्धाचे पालटे फिरविण्यासाठी सज्ज होती. भाऊंसारखा अब्दाली आघाडीवर नव्हता. शहावलीवर सेनापतित्व सोपवून तो महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मागे मोक्याच्या ठिकाणी होता. राखीव तुकडीची योजना आणि अब्दालीचा आघाडीच्या रणतुंबडीपासून दुरावा हे दोन्ही युद्धविजयक घटक ठरले.

मराठा सैन्याच्या सेनापतींमध्ये रणनीतीबाबत मतभेद होते. इब्राहिम गार्दीचे मत गोलाईच्या लढाई बाजूने होते. गोलाईची लढाई म्हणजे सर्व फळ्या शाबूत ठेवून प्रथम शत्रूसैन्याला बलवत्तर तोफखान्याने भाजून काढायचे. शिंदे-होळकरांच्या मते गनिमी काव्याला कौल होता; परंतु भाऊंनी गार्दीची सूचना स्वीकारली.

निर्णायक लढाई


अखेरीस कोंडीला आणि उपासमारीस कंटाळून १४ जानेवारीला भाऊंनी अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढविण्याचा निर्णय घेतला. सर्व संकटे आणि ओढाताणीला न जुमानता मराठय़ांनी अहमहमिकेने आणि निकराने सकाळीच लढाईला सुरुवात केली. काही गोळाफेक अब्दालीच्या आघाडीच्या तुकडय़ांपल्याड गेली तरी तोफखान्याचा मारा इतका भयंकर होता की, पश्चिमेस रोहिल्यांच्या फळीत एक भले मोठे खिंडार पडले. त्याचबरोबर भाऊसाहेबांच्या शाही तुकडीनेही शहावलीला मागे रेटले. पूर्वेस शिंदे-होळकरांच्या तुकडय़ांना मात्र नजीबने तटवून धरले होते. बारा-एक वाजेपर्यंत मराठय़ांची सरशी स्पष्ट दिसत होती.

दुर्दैवाने तेव्हापासूनच पारडे पलटू लागले. सूर्य दक्षिणायनात असल्यामुळे भर दुपारी उत्तरेकडून दक्षिणेकडे चाल करून जाणाऱ्या घोडय़ांच्या डोळ्यांत सूर्यकिरणे पडू लागली आणि ते बुजू लागले. त्याचबरोबर उपासमारीने रोडावलेले घोडे आणि त्यांच्यावरील स्वार पार थकून गेले आणि जागीच कोसळू लागले. इब्राहिम गार्दीच्या तोफांनी पाडलेले खिंडार पाहून हल्ला करण्यास अधीर झालेले विंचूरकर आणि गायकवाड या दोघांनी इब्राहिमच्या आर्जवांना भीक न घालता अवेळी चढाई केली. बिनबंदुकीचे घोडेस्वार पाहून माघारी जाणाऱ्या रोहिल्यांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षांव केला आणि मराठी तुकडय़ा परत फिरल्या. भाऊ आणि विश्वासराव आपल्या हत्तीवरून खाली उतरून लढू लागले आणि ठार झाले. मोकळ्या अंबाऱ्या पाहून मराठा सैन्याचा धीर खचला आणि ते सैरावैरा धावू लागले. हीच संधी साधून अब्दालीने आपले ताजेतवाने राखीव सैन्य पुढे केले आणि पळणाऱ्या मराठी सैन्यावर प्राणघाती हल्ला चढवला. याचवेळी विंचूरकरांच्या शिबिरात ठेवलेल्या अफगाणांनीही उठाव केला. दुसरा कोणता पर्याय नसल्याचे पाहून होळकर आणि शिंद्यांच्या तुकडय़ांनी सापडलेल्या फटींमधून दक्षिणेकडे कूच केले.

सूर्यास्तापर्यंत मराठा सैन्याचा दारुण पराभव झाला. बाकी होती ती गिलच्यांकडून मराठी बंदी सेनेची, बुणग्यांची आणि यात्रेकरूंची निर्घृण कत्तल! तो एक केवळ काळा इतिहास!

युद्धतत्त्वांच्या निकषांवर परीक्षण


युद्धशास्त्रात युद्धाची दहा तत्त्वे (Principles of War) गठीत करण्यात आली आहेत.
या निकषांवर तिसऱ्या लढाईचे परीक्षण -

उद्दिष्टाची निवड आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा (Selection and Maintenance of Aim)-
याबाबतीत दोन्ही सरसेनापती अपुरे ठरले. अब्दाली आणि भाऊ या दोघांनी वारंवार तहाचा विचार केला आणि त्यामुळे दोघांच्याही युद्धशक्तीवर परिणाम झाला. याबाबतीत खरा ठरला तो नजीबद्दौला. मराठय़ांचा उत्तरेतून नायनाट करायचा, हे त्याचे उद्दिष्ट. त्यानेच जिहादची घोषणा करून अब्दालीला लढाईच्या भरीस घातले आणि आपले उद्दिष्ट तडीस नेले.

सुरक्षितता (Security)-
सैन्यक्षेत्र, सैन्यदल आणि आपल्या रसद मार्गाची सुरक्षितता साधणे महत्त्वाचे आहे. यासाठी टेहळणी पथक आणि पहाऱ्याची आवश्यकता असते. मराठा सैन्याचा या बाबीतील हलगर्जीपणा त्यांना भोवला. बुणगे आणि यात्रेकरूंचे ओझे हा सुरक्षिततेला मोठा धोका ठरला.

इच्छाशक्ती टिकवणे (Maintenance of Morale)-
मराठा सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती दिवसागणिक क्षीण झाली होती. तरीसुद्धा सुरुवातीचा विजय हे त्यांच्या लढाऊ वृत्तीचे द्योतक आहे.

विस्मय आणि शाठय़ (Surprise and Deception)-
अब्दालीची यमुनापार चाल याबाबतीत निर्णायक ठरली. मराठय़ांची ही प्रमुख त्रुटी.

सैन्यबळाचे एकवटीकरण (Concentration of Force)-
युद्धशक्तीच्या प्रकाराचा हा सर्वात मोठा गुणक. आपली शक्ती वेगवेगळ्या जागी विभाजित करून ती खच्ची करणे, हे सेनापतीच्या अपरिपक्वतेचे दर्शक आहे. सर्व फळ्यांनी हल्ला करण्यापेक्षा एकच भगदाड पाडून बाकी सर्व ठिकाणी संरक्षणात्मक पवित्रा घेणे, हे फायदेशीर असते. मराठे याबाबतीतही कमी पडले.

सैन्यबलाचा वित्तव्यय (Economy of Force)-
अत्यंत धूर्त व्यूहरचना, मोक्याच्या ठिकाणी घणाघात आणि राखीव दलाच्या साहाय्याने हे सिद्ध होऊ शकते. मराठे हे साधू शकले नाहीत.

लवचिकता (Flexibility)-
नवनव्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी युद्धयोजनेत लवचिकता हवी. शिवाजी महाराजांच्या सर्व लढाया ही याची उदाहरणे आहेत. यासाठी राखीव दलाची योजना आवश्यक आहे. भाऊंची ही एक महत्त्वाची चूक होती.

सहकार्य (Co-operation)-
सैन्याच्या विविध अंगांमध्ये आणि तुकडय़ांत सहकार्याची नितांत गरज असते. मराठा सैन्यातील दुफळीने त्यांच्या क्षमतेवर दुष्परिणाम झाले.

व्यवस्थापन (Administration)-
हा मराठा सैन्याचा सर्वात मोठा दोष. निर्णयकर्त्यांनी याच्याकडे पूर्णतया दुर्लक्ष केले. किंबहुना व्यवस्थापनाचा बोजडपणा आणि अनावश्यक यात्रेकरूंचे लोढणे हा मराठय़ांच्या अपयशाचा सर्वात मोठा पाईक आहे.

निर्णायक वळणे



पानिपतच्या लढाईत पाच मोक्याची वळणे नमूद करता येतील.

  • गरजेपेक्षा अधिक बुणगे आणि यात्रेकरू फौजेबरोबर पाठविण्याचा निर्णय आणि सूरजमलच्या प्रस्तावाला भाऊंचा नकार.
  • अब्दालीचे यमुना उल्लंघन.
  • नोव्हेंबरमध्येच अब्दालीवर हल्ला चढविण्याची गमावलेली संधी.
  • एकाच ठिकाणी प्रहार करून भगदाड पाडण्याऐवजी सैन्याची पसरण आणि
  • राखीव दलाचा अब्दालीकडून वापर आणि त्याबाबतीत मराठय़ांची त्रुटी.


सदाशिवरावभाऊंच्या नेतृत्वावर बऱ्याच शंका घेतल्या जातात. अब्दाली त्यांच्यापेक्षा अधिक अनुभवी होता. भाऊ त्याआधी फक्त उदगीरची लढाईच जिंकले होते. पण तरीही अनेक अडचणींवर मात करून शत्रूवर हल्ला करण्याचा खंबीरपणा हे त्यांच्या अद्वितीय नेतृत्वाचे द्योतक आहे. ते अत्यंत शूर होते. जर मध्यान्हीनंतर नशीब फिरले नसते तर कदाचित आज एक उत्तुंग नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव झाला असता.

पानिपत ही एक भारतासाठी दिशादर्शक घटना होती. जर मराठेजिंकले असते तर ना इंग्रज बळावले असते किंवा ना हैदरअलीचा उदय झाला असता. कदाचित दिल्लीवर मराठी झेंडा फडकला असता.

पानिपतची लढाईमुळे मराठी मानसात न्यूनगंड निर्माण न होता, तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजे. तो मराठी जनतेसाठी ऊर्जेचा, स्फूर्तीचा, निस्वार्थी देशभक्तीचा एक स्रोत व्हायला हवा. प्रत्यक्ष रणांगणात ठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कामी आलेल्या मराठय़ांच्या दीडपट होती, हा एकमेव घटक मराठा शूरत्वाची आणि ‘मोडेन पण वाकणार नाही’, या बाण्याची ग्वाही देतो.

...तो आपका अल्ला ही मालिक है !

एक ग्यारवी के छात्र कैलाश तिवारी की मेहनत देखिये और कुछ समझने का प्रयास करे .....
अगर फिर भी इसमे वीएचपी और आरएसएस का षड्यंत्र नजर आए तो आपका अल्ला ही मालिक है !!!


Know the Little Bit about RSS >>